लंकेजवळ पोचल्यावर युद्ध सुरु करण्याआधी श्रीरामाने वाली  व तारा यांचा तेजस्वी पुत्र अंगद याला वकील म्हणुन रावणाकडे पाठवले. लंकेत ...

अंगद शिष्टाई



लंकेजवळ पोचल्यावर युद्ध सुरु करण्याआधी श्रीरामाने वाली  व तारा यांचा तेजस्वी पुत्र अंगद याला वकील म्हणुन रावणाकडे पाठवले. लंकेत पोचल्यावर त्याने रावणाशी संवाद साधताना त्याने रामाचा निरोप सांगितला की सीतेला सन्मानाने परत पाठव अन्यथा युद्धास तोंड द्यावे लागेल.  हे ऐकून रावण रागावला आणि त्याने अंगदाला पकडून तुरुंगात टाकायची आज्ञा केली. अंगदाने तेव्हा लंकेत हाहाकार उडवून दिला आणि शेपटीने जाळपोळ केली. तदनंतर तो रामाकडे परत आला. 


वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडाच्या ४१ व्या सर्गात या प्रसंगाचे वर्णन येते. परंतु वाल्मिकी रामायणात अंगदाने शेपूट वापरून आसन तयार केले असे वर्णन मला सापडले नाही. परंतु लोक साहित्यात असे वर्णन वारंवार येते. 


उत्तराखंड मध्ये केदारकण्ठ ट्रेक ची सुरवात जिथे होते त्या सांकरी गावातील समेश्वर मंदिरातील हे अंगद शिष्टाईचे चित्र 

जानेवारी २०२१.